HW News Marathi
Covid-19

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा

मुंबई | कोरानाचा संसर्ग कमी झाल्यापासून अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. पण आता 2 डोस पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याआधी फ्कत पासच मिळत होता. मात्र, आता लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट

2 डोस पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी लोकलचं तिकीट मिळणार आहे. याआधी फ्कत पासच मिळत होता. मात्र, आता लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार आहे. त्यामुळे मुंबई करांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर 2 डोस पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना एक दिवसाचा प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने पश्चिम आणि मध्य रेल्वेला तसं पत्र पाठवलं आहे. राज्य सरकरच्या या निर्णयाची आंबलबजावणी केव्हापासून सुरू होणार हे अद्याप कळू शकलेलं नाही. संबंधित माहिती सरकारकडून घ्यावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व मुंबईकर रेल्वेने प्रवास कधी करता येणार या प्रतिक्षेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा यांची बैठक

News Desk

राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला, कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये !

News Desk

कोल्हापुरात पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन

News Desk