HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल, कळणारच नाही ! चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

मुंबई । राज्यात अगदी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच वारंवार भाजपकडून हे सरकार लवकरच पडणार असल्याचे अनेक दावे केले आहेत. अशाच पद्धतीचा आणखी एक दावा करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (२७ मे) पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. “महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल. कळणारच नाही”, असे अत्यंत मोठे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, “झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं इतका विश्वासघात झाला असं देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले होते. केसाने गळाने कापतात ना तसंच काहीसं. आता तुम्ही हे सरकार कधी पडणार विचारत आहात तर मी सांगतो की, याच पद्धतीने सगळे झोपेत असतानाच हे सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं”, असा अत्यंत मोठा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, ह्या दाव्यानंतर निश्चितच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल !

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गेले अनेक दिवस विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून जुंपत आहे. तर भाजप खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाले आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (२७ मे) एक इशारा दिला आहे. “मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. तसेच, “भाजप हा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देईल”, असेही चंद्रकांत पालकांनी पुन्हा जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य आणि केंद्र सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

News Desk

अनिल देशमुखांच्या पत्नीला आता ED चं समन्स, चौकशीसाठी लावावी लागणार हजेरी

News Desk

भोकर, बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ” संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार “

News Desk