HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून राज्यपाल नागपूर मुक्कामी, मुंबई परतीचा उल्लेख नाही 

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आजपासून (२२जुलै) आपला मुक्काम नागपूरला हलवला आहे. मात्र, कोणतीही सभा, बैठक किंवा कोणताही कार्यक्रम नसताना राज्यपालांनी अचानक आपला मुक्काम नागपूरला हलवण्यामागचे कारण काय ? हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याचप्रमाणे, हे पुन्हा नागपूरहून मुंबईला कधी परतणार ? याबाबतचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, सध्या यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असली तरीही अद्याप राजभवनाकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

मुंबईतील कोरोनास्थिती गंभीर आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग राजभवनापर्यंत पोहोचला आहे. राजभवनात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यपालांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपला मुक्काम नागपूरला हलवल्याची देखील चर्चा सुरु आहे. त्यातच राज्यपालांच्या नियोजित वेळापत्रकात कोणत्याही कार्यक्रम, सभा, बैठकीचा त्याचप्रमाणे त्यांच्या मुंबई परतीचा देखील उल्लेख नसल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी ‘या’ कारणासाठी शरद पवारांची भेट घेतली, राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण

News Desk

सनातन संस्थेवर बंदी घाला | अबू आझमी

swarit

कल्याण-डोंबिवलीत बसलेल्या धक्क्याचा ‘मनसे’ने थेट कोकणात घेतला बदला

News Desk