HW News Marathi
देश / विदेश

‘त्या’ नावांची घोषणा राज्यपालांनी लवकरात लवकर करावी, अन्यथा…!

मुंबई । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीसरकारकडून गेल्या आठवड्यात १२ नावांची शिफारस यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही याचं पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. “राज्यपालांनी राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या नावांची घोषणा लवकरात लवकर करावी.अन्यथा याचा संदेश बाहेर चुकीचा जाऊ शकतो”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी या शिफारस यादीतील १२ नावांबाबत १५ दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते. या १२ नावांमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या प्रत्येक ४ उमेदवारांची नावे आहेत. याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “राज्यपाल नियुक्त १२ नावांची घोषणा राज्यपालांनी लवकरात लवकर केली पाहिजे. नाहीतर यात राजकारण होत असल्याने उशीर होतो आहे असा चुकीचा संदेश बाहेर जाऊ शकतो. राजकीय नेत्यांनी काहीही सांगितलं तरी राज्यपालांनी राज्यघटनेचा आदर केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे”, असे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले

महाविकासआघाडीकडून ‘या’ १२ नावांची शिफारस

शिवसेना

१) उर्मिला मातोंडकर
२) नितीन बानगुडे पाटील
३) विजय करंजकर
४) चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी काँग्रेस

१) एकनाथ खडसे
२) राजू शेट्टी
३) यशपाल भिंगे
४) आनंद शिंदे

काँग्रेस

१) सचिन सावंत
२) रजनी पाटील
३) मुजफ्फर हुसैन
४) अनिरुद्ध वनकर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

News Desk

आता व्हॉट्सअॅपवर सुद्धा जाहिराती ?

News Desk

गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वादग्रस्त सरदार सरोवराचे मोंदीच्या हस्ते लोकार्पण

News Desk