HW News Marathi
महाराष्ट्र

गुजरात मधील भक्ताने अर्पण केला शनीचरणी १९ लाखांचा कलश

शनिशिंगणापूर | गुजरातच्या अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोने व चांदी पासून घडविलेला कलश शनीचरणी बुधवारी सायंकाळी शनीचरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोने व ४२९० ग्रॅम चांदीचा वापर करुन हा कलश तयार करण्यात आला आहे. परंतु दान करणा-या भक्ताने नाव गुप्त ठेवले आहे.

बुधवारी सायंकाळच्या महाआरतीनंतर हा कलश चौथ-यावर ठेवण्यात आला आहे. कलश अर्पण करणा-या भक्ताचे नाव प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले नसले तरी देवस्थानाकडून शाल, श्रीफळ आणि शनिदेवाची प्रतिमा देऊन त्या भक्ताचा सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानाला उत्तर देताना त्या शनीभक्ताने सांगितले शनीदेवाच्या दर्शनानंतर मला एक ऊर्जा मिळते, वेगळे समाधान मिळते मी गेले १५ वर्षे या ठिकाणी दर्शनासाठी येतो. देवस्थानाने भक्तांना उत्तम सुविधा दिल्या आहेत. समाज कार्यांतही देवस्थान ट्रस्टचा उल्लेखनीय सहभाग असल्याचे त्या भक्ताने यावेळी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले : अशोक चव्हाण

News Desk

हिंदू असणे हे पाप आहे का?, गडकरींचा सवाल

News Desk

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार? जयंत पाटील म्हणतात…

News Desk
राजकारण

मला सेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, राज्य उभारायचे आहे | उद्धव ठाकरे

Gauri Tilekar

बीड | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बीडमध्ये भगवा फडकवायचा असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांना थेट इशाराच दिला आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, कारण मला राज्य उभारायचे आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत बहिणीविरुद्ध उमेदवार देणार असे म्हणणाऱ्या उद्धव यांनी यंदा मात्र बीडमध्ये उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोपीनाथ मुंडेंसाठी आम्ही एक एक मतदारसंघ सोडला. परंतु आता मला बीडमध्ये सर्व जागांवर भगव्याचे राज्य पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय ? असेच सुरु राहिले तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाऊ शकेल असे वाटत नाही. देशात आणि राज्यात तब्बल ३० वर्षानंतर हिंदू सरकार आले आहे. परंतु लोकांच्या पदरी निराशाच पडली आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, काल (सोमवारी) केंद्र आणि राज्यात सत्तेत राहून भाजपवरच टीका करणाऱ्या शिवसेनेला भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अल्टिमेटम दिले होते. त्यामुळे आता ‘सत्तेला कधीही लाथ मारू’ असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना याबाबत आता अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले होते. मात्र अमित शहा यांच्या या अल्टिमेटमवर उद्धव ठाकरे यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.

Related posts

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही – गिरीश बापट

swarit

“मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो,” आदित्या ठाकरेंच्या टीकेला सत्तारांचे प्रत्युत्तर

Aprna