HW News Marathi
महाराष्ट्र

सुप्रीम कोर्ट म्हणालं मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायरस – गुणरत्न सदावर्ते

मुंबई | राज्याच्या राजकारणातील ज्वलंत मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणावर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळून लावत राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा आज (५ मे) रद्द केला आहे.

मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणारे अ‍ॅड गुणरत्ने सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. मी आनंदाने या निकालाचे स्वागत करतो. “महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंतांनी, ज्या प्रकारे माझं, माझ्या कुटुंबाचं समर्थन केलं. माझ्यामागे शक्ती म्हणून उभे राहिले. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो” असे सदावर्ते निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले आहेत.

“मराठा समाजाचे ५२ मोर्चे झाले. त्यासाठी BMW मधुन गर्दी जमवली. देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला” असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. “ही खुल्या गणुवंतांची संविधानासोबतची लढाई होती. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस घोषित केले” असे विधान गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.

“गायकवाड समितीचा अहवाल रद्द केला. इंद्रा सहानी खटला सात न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे पाठण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मराठा आरक्षण मागास ठरत नाही” असे सर्वोच्च न्यायालयाने डंके की चोट पर सांगितल्याचा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक!

News Desk

मुंबईच्या हद्दीत ८ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna

हॉटेल, बार, उपहारगृहासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी!

News Desk