HW News Marathi
महाराष्ट्र

पवार साहेब नसते तर ‘हे’ मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते…निलेश राणे गरजले!

मुंबई |  काल पुण्यात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं कि पवारसाहेबांनी आदेश दिला आणि मी मुख्यमंत्री झालो,कमीत कमी आमदारांत  सरकार कसं बनवायचं हे पवारांनी शिकवलं. त्याचपद्धतीने ठाकरे म्हणाले कि मी इथे काही चुकीचं बोललो तर त्याची जबाबदारी पवारांची. उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे शरद पवार यांचं कौतुक केल्याने आता त्यांच्यावर माजी खासदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे .

शरद पवार यांचे कौतुक सध्या उद्धव ठाकरे करत आहे, त्यांना त्यांच्या वडिलांचा म्हणजे बाळासाहेबांचा विसर पडला आहे, ज्या बाळासाहेबांनी शिवसैनिक घडवले त्यांचा मुलगा आता पवारांचे गुणगान गातोय. कारण पवारसाहेब नसते तर उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर गोट्या खेळात बसले असते असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे .

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून शिवसेना आणि राणे कुटुंबिय यांच्यातील शाब्दिक युद्ध सतत चालू असते. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रातूनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहे.महाविकासाघडीचे सरकार स्थापन झाल्यापासून निलेश राणे ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर आगपाखड करत असतात.युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांना z सुरक्षा दिली गेली असल्याच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी सरकारला धारेवर धरले . त्यानंतर आता थेट उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर त्यांनी वार केला आहे .

निलेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि , ‘हा माणूस स्व. बाळासाहेबांना विसरला. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर शिवसैनिक घडवला त्यांचाच मुलगा त्यांना विसरून रोज पवार साहेबांचे गुणगान गातोय. कारण सोप्पं आहे, पवार साहेब नसते तर हे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘….तर’ यांच्यापाठोपाठ निलेश राणे म्हणाले, दिसेल तिथे संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू!

News Desk

पोलीस बदली प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदविला; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

Aprna

‘अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं’

News Desk