HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्ही सरकारमुळे नाही…”, नाना पटोलेंच्या वक्तव्याची जयंत पाटलांकडून पाठराखण

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचं स्थान याविषयी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, “हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत.” असं विधान केल्यानंतर आता यावर महाविकास आघाडीतील नेत्यांसह राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील याबद्दल आपलं म्हणणं माध्यमांशी बोलताना मांडलं आहे. जयंत पाटील यांनी नाना पटोलेंची पाठराखण केल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

“त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना अधिकार आहे, आणि आमच्या तिन्ही पक्षात अशा कोणत्याही विधानाने गैरसमज होत नाहीत. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याचं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही.” असं जयंत पाटील यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.

नाना पटोले यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचं स्थान याविषयी बोलताना सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडली आहे. “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं ते म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले होते?

तर, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी, “काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील…त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही,” असं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले

News Desk

सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ – धनंजय मुंडे

News Desk