HW News Marathi
महाराष्ट्र

अर्ध्या तासात शरद पवारांनी उभारला कोटींचा निधी

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या दुष्काळी तालुक्यांचा दौरावर आहेत. जलसंधारणाच्या कामाची पहाणी करत असताना, ग्रामस्थांशी चर्चा करताना निधी कमी पडत असल्याचे शरद पवार यांच्या लक्ष्यात आले. त्यानंतर पवार यांनी अवघ्या अर्ध्या तासात साडेसहा कोटींचा निधी उभारला.

श्रमदानातून जलसंधारणाचे काम करुन दुष्काळाचे नामोनिशाण मिटवण्यासाठी लागेल, ती मदत करायला मी तयार आहे, या गावातील लोकांना जमा निधी तत्काळा गावागावात पोहोचावा. या निधीतून डिझेल आणि तांत्रिकीकरणाचे काम करावे, आणखी लागेल ती मदत मी करायला असल्याचे शरद पवार यांनी माण आणि खटावच्या जनतेला सांगितले.

साताऱ्यातील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक कोटीची मदत करण्याची ग्वाही दिली. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची दीड कोटींची मदत, त्यानंतर मुंबई व पुण्यातील उद्योग जगतातील काही लोकांना मदत करण्यासाठी पवार यांनी विनंत केल्यानंतर त्यांनी दोन कोटीची मदत करण्याचे मान्य केले. अवघ्या अर्ध्या तासाभरात शरद पवार यांना तब्बल साडेसहा कोटीचा निधी जमा केला.

कोणी किती मदत निधी

  • सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक – १ कोटी
  • सातारा जिल्हा परिषद – दीड कोटी
  • सातारा जिल्हा नियोजन समिती – १ कोटी
  • शरद पवार यांच्या खासदार निधीतून – ५० लाख
  • वंदना चव्हाण खासदार निधी – ५० लाख
  • मुंबई, पुणे काही उद्योजक – २ कोटी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जनाब संजय राऊत MIM की मोहब्बत कौन? गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

News Desk

किरीट सोमय्या यांचा हसन मुश्रीफांवर शेकडो कोटी घोटाळ्याचा आरोप!

News Desk

मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, संभाजीराजेंचा एल्गार!

News Desk
महाराष्ट्र

फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात | विनायक राऊत

News Desk

रत्नागिरी | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात. ते कोकण उद्धवस्त करायला निघाले आहेत. मात्र कोकणची जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला ते रत्नागिरी येथे झालेल्या सभेत बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेला नाणार प्रकल्प गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या प्रकल्पा संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारमध्ये सोमवारी उपस्थित होते. त्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, 3 लाख कोटी, 4 लाख कोटींचे प्रकल्प कोकणाला नकोत. प्रदूषणामुळे कोकण उद्धवस्त होणार आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाला सातत्याने विरोध केला आहे. मी स्वत: पंतप्रधान, पेट्रोलिय मंत्र्यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांना ग्रामसभांचे ठराव दिले, मात्र मुख्यमंत्री फक्‍त हसले. फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात ते आता कोकणाला उद्धवस्त करायला निघाले आहेत मात्र शिवसेना कोकण उध्वस्त होऊ देणार नाही.

 

Related posts

काँग्रेस पक्ष बिंडोक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले

News Desk

“एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”, राऊतांचा सवाल

News Desk

महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा आहे – नारायण राणे 

News Desk