HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस पक्ष बिंडोक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागा मंजूर असेल तरच त्यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. “सध्याचा काँग्रेस पक्ष बिंडोक असल्याचे सांगत आंबेडकरांनी टीका करताना म्हणाले आहे. पुढे असे देखील म्हणाले की, काँग्रेस पक्ष फक्त आता शरीर राहीले असून डोके रिकामे आहे. तर मी वन मॅन आर्मी, असल्याचे आंबेडकर म्हणाले” राज्यातील विधानसभा या बॅलेट पेपरवरच घ्याव्या, अशी मागणी देखील आंबेडकर यांनी आज (१५ जुलै) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

“भाजपने मला राज्यसभेची ऑफर दिली नाही. भाजप मला राज्यसभा देणार हे बोलले जात होते. परंतु यात काही तथ्य नाही. मी सत्तेचा भुकेला नाही. इतके वर्षे मी जनाधार जमवला आहे, हीच माझी सत्ता आहे,” असे वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर म्हणाले.माझी आणि असदुद्दीन ओवेसींसोबत बैठक झाली असून या बैठकीत आघाडी पुढे कायम ठेवणार असल्याचे ठरले आहे, असही आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान,एमआयएमने वंचितकडे १०० जागांची मागणी केल्याची बातमी पेरली गेली आहे. परंतु एमआयएमची १०० जागांची काही मागणी नाही, असेही स्पष्ट मत आंबेडकर यांनी यावेळी केला होता.

कर्नाटक भाजप हळू काम करते

भाजपचे कर्नाटकात चालू असलेले फोडाफोडीचे राजकारण नवीन नाही, काँग्रेसने देखील असे राजकारण केल्याचे आंबेडकरांनी सांगतिले. कर्नाटकात भाजप फार हळू काम करत असल्याचा सांगितले. महाराष्ट्र विधानसभेच्या अगोदर काँग्रेसचे देशातील राज्य असलेले सत्ता भाजप सरकारने पडण्याची विनंती केली आहे. तीनही सरकार पडणार

निवडणूक बॅलेट पेपर घ्यावी

राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानात फरक दिसला. रिटर्निंग ऑफिसने ही माहिती आयोगाला कळवली नाही. असे प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले. तर, आम्ही ईव्हीएम बाबत जनआंदोलन सुरूच ठेऊ. लोकसभा निवडणुकीत ४८ मतदार संघातील फरक आम्ही समोर आणला आहे. न्यायालयाने आता यावर उत्तर द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या अशी मागणीही त्यांनी केली.

आगामी निवडणुका बॅलेटपेपरवरच घेण्यात यावे, असे आंबेडकर म्हणाले. निवडणूक आयोग, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी ईव्हीएम हॅक होणार नाही, असा दावा केला आहे. मात्र, वंचित कडून निवडणुक आयोगाच्या या दाव्याला आव्हान दिले असून उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद आणि नागपूर खंडपीठत ईव्हीएम विरोधात ३१ याचिका दाखल आहेत. न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदानाच्या आकडेवारीत फरक कसा झाला याबाबत विचारणा करावी, असे आंबेडकर म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदलत्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी दिव्यांगांना सक्षम करावे! – अजित पवार

Aprna

हिजाब प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार; कर्नाटक न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत! – ओवेसी

Aprna

बेळगाव सीमा भागातील लोकांच्या भावना लक्षात घ्या- आ. डॉ. नीलम गो-हे यांची मागणी

News Desk