HW News Marathi
महाराष्ट्र

….हे तर देसाईंचे मत | मुख्यमंत्री

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या नाणार दौ-यावर आहेत. त्यामुळे साहजिकच तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हे लक्षात घेता नाणारमध्ये सोमवारी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली यावेळी सभेत बोलताना उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा केली.

सुभाष देसाईंनी जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्याचे घोषित करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अशी नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. त्याचबरोबर अधिसूचना रद्द हे सुभाष देसाई यांचे वैयक्तिक मत आहे. परंतु या प्रकल्पासंदर्भात सचिवांची समिती (हाय पॉवर कमिटी) जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असेल. तसेच आध्यदेश रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत. कोकण आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक शिवसेना आघाडी सरकारसोबत एकत्र लढणार 

News Desk

मुंबई विजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री ‘ग्राऊंड झिरो’वर

News Desk

“अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”, भाजप पक्षाकडून ठाकरे सरकारवर हल्ला

News Desk