HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ,मुश्रीफांचा टोला …

मुंबई | “माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली,” असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील ४० पेक्षा जास्त अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोना काळात अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरु असल्याने सरकारवर टीका केली जात आहे.

“काही अधिकारी फडणवीस सरकार काळातील ते खाल्या मिठास जागत होते. यामुळेच त्यांना बदललं,” अशी टीका मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांचे नाव न घेता केली. दरम्यान नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालीे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालाने स्वतःकडे ठेवली आहे विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची यादी!

News Desk

भुजबळ यांच्या जामीनावर सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टचा नकार

News Desk

राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे !

News Desk