HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील लाॅकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता ! राऊतांचं अजितदादांवर बोटं?

मुंबई | सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबईपेक्षा पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशातच काल (२ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीचे पत्रकार पांडूरंग रायकर यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन झाले. कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने प्राण गमवावे लागलेले ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. पुण्यात अँम्ब्युलन्स मिळू नये हे दुर्दैवी आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांच्या निधनानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.एकीकडे पुण्यातील वाढती रूग्णसंख्या आणि जंबो कोविड हाॅस्पिटलच्या दुरावस्थेबद्दल सरकारला टार्गेट केलं जात असताना राऊतांनी मात्र वेगळीचं प्रतिक्रिया दिली आहे.पुण्यातील लॉकडाऊन इतक्यात उठवू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचें मत होते. त्यामुळे आता अजित पवारांवर संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे टिका केलीये का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. काम होण्याशी मतलब आहे. ‘डिजिटल इंडिया’ वापरुन पीएम काम करतात, तसंच सीएमही काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी टीकाकारांना दिले.

मंदिरे खुले करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भूमिका आहे

“लॉकडाऊनची भूमिका केंद्र सरकारची आहे. सरकारला काय हौस नाही हे बंद करायची. मंदिरांचे एक अर्थशास्त्र आहे. मंदिरे खुले करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भूमिका आहे. योग्य वेळी ते निर्णय घेतील. लोकांच्या जीविताशी खेळलं जावू नये, रस्त्यावर उतरुन हे संकट वाढवू नये” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.”मुंबईत काल अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणं गरजेचं आहे,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

“सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवलं पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार करोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचं आहे हे माहिती असतानाही विरोध असं वागत असतील तर हे जनतेच्या हिताचं नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करतंय असा आरोप केला आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करु नये असं घटनेत लिहिलं आहे का? बदल्या करु नका असं कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिलं आहे. तुमच्या लोकांनाच वर्षानुवर्ष ठेवून राज्य करावं का? बदल्या काय फक्त आम्हीच केल्या का ? बदल्या करुन आम्ही काय नवीन चमत्कार केला का? मनमोहि सिंग यांचं सरकार जाऊन मोदींचं सरकार आलं तेव्हा बदल्या केल्या नाही का ? बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि तो करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका, रोहित पवारांचे ‘हे’ प्रत्युत्तर 

News Desk

काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली! – मुख्यमंत्री

Aprna

‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !’ -छत्रपती संभाजीराजे

News Desk