HW News Marathi
महाराष्ट्र

धार्मिक तेढ निर्माण होणे ही निराशाजनक बाब, प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली खंत

बीड | राज्यभरात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी एकिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने देखील मनसेच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. हनुमान जयंतीला भाजपच्या वतीनेही भोंग्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील भोंग्यांच्या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्पष्ट नाव न घेता त्यांनी खंत व्यक्त केली. धार्मिक तेढ निर्माण होते आहे, हे चित्र निराशाजनक आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. बीडमध्ये आज (१८ एप्रिल) पत्रकारांशी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

राज्यातील मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत हटवले जावे, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. तसेच सर्वच जिल्ह्यांतील मनसे कार्यकर्ते याबद्दल आक्रमक भूमिकेत आहेत. याविषयी बोलताना खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, ‘धर्मा-धर्मात दरी निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीना कधी राजकीय लोकांना सामोरे जावं लागणार आहे.’

राजेश टोपेंचं कौतुक

कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केलं, अशी प्रतिक्रियाही खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली. राजकीय आरोप प्रत्यारोप वेगळा मुद्दा असतो. मात्र कोविड काळात महाराष्ट्रासारख्या देशातील एका मोठ्या राज्यात आरोग्य व्यवस्थेवर संकट होतं. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या तसेच स्थलांतरीत मजुरांचा येथे प्रश्न असतानाही महाराष्ट्र सरकारने चांगली कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत कोणी किंमत दिली नाही, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, संभाजीराजेंचा एल्गार!

News Desk

तुषार गांधींचे पुण्यातील महात्मा गांधींवरील चर्चासत्र अचानक रद्द

News Desk

बाभळी बंधारा कुणासाठी ? – महाराष्ट्रातील जनतेचा सरकारला सवाल

News Desk