HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : कॉर्पोरेट कंपन्यांशी सकारात्मक चर्चा, राज्यात शटडाऊनची गरज, आरोग्यमंत्री

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने मोठी पावले उचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची परिस्थिती संवेदनशील असून राज्यात शटडाऊनची गरज असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील २० ते २५ कॉर्पोरेट कंपन्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी सहकार्य करण्यास तयार असून वर्क फ्रॉम होम करण्यास सहकार्य केले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री आज (१७ मार्च) पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.

तसेच खाजगी कंपन्यांची कार्यलय बंद करण्याबाबत सरकारला सहकार्य करणार, असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्रीदिली आहे. मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांसबोत चर्चा करून पुढे निर्यण घेऊ असेही यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले. मुंबईतील लोकसेवा आणि मेट्रो यांच्यासंदर्भातील कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे, अशी ही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३.३० वाजता कॅबिनेट बैठकही होटणार आहे.

औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली असता त्यांनीही मोफत औषध पुरवठा करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री दिली. राज्यात कोरोनामुळे एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या नागिरकाचा मृत्यू कोरोनाने झाला यांचे निदान अद्याप झालेले नाही. याबदद्ल रिपोर्ट आल्यानंतर कळेल की, या ज्येष्ठ नागिराकांचा मृत्यू कोरोनाने झाला का?, मात्र, हा ज्येष्ठ नागरिक दुबईहून मुंबईला आला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फाशी घेण्याची वेळ आणेपर्यंत एका माणसाने छळलं… एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

News Desk

“यात्रा, जत्रा कधी सुरू होणार?” अमित देशमुखांचं विधान!

News Desk

‘मॉब लिंचिंग’ सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र !

News Desk