HW News Marathi
महाराष्ट्र

प्लास्टिकच्या याचिकेवर २० जुलैला सुनावणी

मुंबई | राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय आजपासून लागू झाला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे.

व्यापा-यांनी प्लास्टिक बंदीविरोधात याचिका दाखल केली आहे. परंतु या याचिकेवर २० जुलै ला सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुणावणी २० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र ही बंदी लागू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीला आजपासून सुरुवात झाली आहे. प्लास्टिक बंदी प्रभावी होण्यासाठी राज्य सरकारन महत्त्वाची पावले उचलत आहे. प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर छापे टाकण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबाद जिल्हयातील ५ वीच्या मुलीचं नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

News Desk

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

News Desk

देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार

News Desk