HW News Marathi
महाराष्ट्र

प्लास्टिकच्या याचिकेवर २० जुलैला सुनावणी

मुंबई | राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय आजपासून लागू झाला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे.

व्यापा-यांनी प्लास्टिक बंदीविरोधात याचिका दाखल केली आहे. परंतु या याचिकेवर २० जुलै ला सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुणावणी २० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र ही बंदी लागू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीला आजपासून सुरुवात झाली आहे. प्लास्टिक बंदी प्रभावी होण्यासाठी राज्य सरकारन महत्त्वाची पावले उचलत आहे. प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर छापे टाकण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

News Desk

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे –  एकनाथ शिंदे 

News Desk

सरकारची दडपशाही व पोलिसांचा दहशतवाद त्वरीत बंद करा – अॅड. डॉ. सुरेश माने

News Desk
क्राइम

भिमा-कोरेगाव प्रकरणात एकबोटेंच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी

swarit

पुणे – भिमा-कोरेगाव प्रकरणात मिलिंद एकबोटे त्यांना अटकपूर्व जामीनाचे याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यांना अटक होणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. याआधी एकबोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर एकबोटे यांनी पुण्यातील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्च केला होता. पण, न्यायालयाने देखील २२ जानेवारी त्यांची याचिका फेटाळली.

भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला वदंना करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर जमावाने हल्ला केला होता. त्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिंड गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Aprna

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशीत NCB ला कबुली, म्हणाला-

News Desk

श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna