HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई।राज्यात उद्यापासून तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यात आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. उद्यापासून म्हणजेच 4 ते 6 सप्टेंबर या दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे.आज बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही भागात पावसाची शक्यता आहे

येत्या 5 सप्टेंबरसाठी हवामान विभागानं पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर 6 सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन चार दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूनची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…अमिताभ बच्चन व अक्षय कुमारचे पिक्चर महाराष्ट्रात बंद पाडू – नाना पटोले

News Desk

पुढच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या बाजुला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल !

News Desk

भोकर आर्य वैश्य युथ अध्यक्षपदी महेश नारलावार

News Desk