HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी का घेतली राज्यपालांची भेट?

मुंबई | महाराष्ट्रात सध्या राज्यसरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप लगावला.त्यावरून राज्यात सध्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणावी अशी मागणी होत आहे.

यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ 24 मार्चला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला जाणार आहे. त्या आधीच मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.हेमंत नगराळे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.त्याचा फोटो राज्यपालांच्या ट्विटर अकांऊटवरून शेअर करण्यात आला आहे.राज्यातील घडीमोडींच्या पार्श्वभूमिवर या भेटीला महत्व आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरणाला सध्या वेगळेच वळण मिळाले आहे. सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांची अक्ष्यम्य चुकांमुळे उचलबांगडी या साऱ्या प्रकरणांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते.

अनिल देशमुखांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते,असा आरोप त्या पत्रात करण्यात आला. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता.त्यानंतर मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांवरील आरोपांत तथ्य नाही असे सांगत त्यांचा राजीनामा होणार नाही अस स्पष्ट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…पण दिल्लीत कृषीमंत्री म्हणून आयपीएल सामने मात्र भरवता येतात, भाजपने पवारांना डिवचले!

News Desk

बीडमध्ये महावीतरणाच्या विरोधात परळीत भाजप युवा मोर्चाचे अनोखे आंदोलन

Aprna

एकदा कोरोना डोस घेऊन काम होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

News Desk