HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत हायकोर्टाचा दिलासा!

मुंबई। नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा दिला आहे, राणे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कोणतेही कठोर कारवाई करु नये, असा आदेश दिला आहे. पण पुण्याच्या गुन्ह्याबाबत दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला असणार आहे.नारायण राणे यांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ सतीश मानेशिंदे यांनी युक्तिवाद केला होता राज्यसरकारने देखील त्यांच्या तोडीस तोड ज्येष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई सरकारी वकील यांना या केससाठी नियुक्त केला आहे.

नारायण राणेंना दिलासा

नारायण राणे यांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ सतीश मानेशिंदे यांनी युक्तिवाद केला होता राज्यसरकारने देखील त्यांच्या तोडीस तोड ज्येष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई सरकारी वकील यांना या केससाठी नियुक्त केला आहे.नारायण राणेंवर इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तिथे जाण्याची त्यांना गरज नाही.नारायण राणे यांनी 23 ऑगस्टला केलेले हे वक्तव्य प्रक्षोभक नव्हतं असं नारायण राणे यांच्या वकिलांनी सांगितले,

नारायण राणेंना चौकशीसाठी कुठेही हजेरी लावण्याची गरज नाही, जामिनाच्या अटीशर्ती मात्र पूर्ण कराव्याच लागतील.

राणेंच्या वाक्याचं समर्थन नाही

गेल्या 20 महिन्यात जे सुडबुद्धीने सुरू आहे. त्याची यादी करत आहे. ते कशात बसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. त्यावर काय चालू आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रं बसून चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण त्यांची शैली आहे. कोकणात ज्या पद्धतीने बोललं जातं तो अनादर नसतो, असं ते म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका”, नितेश राणेंचा खोचक सल्ला

News Desk

अवघ्या २४ तासांत ‘मनसे’ने नेमला डोंबिवलीचा नवा शहराध्यक्ष! 

News Desk

‘ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही’, उद्धव ठाकरेंचं विधान

News Desk