HW News Marathi
महाराष्ट्र

चांगली गोष्ट करताना गैरमार्ग वापरला, तर हेतू कधीही शुद्ध नसतो, उच्च न्यायालयाने सुजय विखेंना सुनावलं

औरंगाबाद | भाजपचे खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरसाठी थेट दिल्लीहून रेमडेसिवीरचा साठा आणला होता. यावरुन राजकारणात मोठे वादंग निर्माण झालं होतं. यावरुन त्यांच्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. यावरुनच हायकोर्टाने सुजय विखे यांना सुनावले आहे.

एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर ताशेरे ओढले. सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काल (३ मे) उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी सुजय विखे-पाटील यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटले की, माझ्या अशिलाची कृती ही कोणत्याही अंगाने गुन्हेगारी प्रकारात मोडत नाही. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी चार्टर्ड विमानाने परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली. मला मान्य आहे की, हे फाजील धाडस होते, पण हा गुन्हा ठरत नाही, असा बचाव सुजय-विखेंच्या वकिलांनी केला होता.

काय म्हणाले न्यायमूर्ती?

सुजय विखे हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते एक न्यूरोसर्जन आहेत. त्यांचे डॉ. विखे-पाटील स्मृती रुग्णालय एका रात्रीत मोठी झालेली संस्था आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुजय-विखे यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

त्यावर न्यायमूर्ती घुगे यांनी खडे बोल सुनावले. तुमच्या अशिलाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा त्यांनी करायला नको होता. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता, असे न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी घटनेनुसार काम करतोय’, राज्यपालांचं कोशारीचं प्रत्युत्तर!

News Desk

मरकजमध्ये सहभागी झालेल्या १४०० पैकी फक्त ५० जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

“आंदोलनजीवी म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचा अखेर विजय” – नाना पटोले

News Desk