HW News Marathi
देश / विदेश

देशात समान नागरी कायद्यांसाठी, हिंदू एकता संघटनेची मोदींकडे मागणी

नाशिक। देशाला स्वातंत्र्य होऊन आता ७४ वर्ष झाली आहे. साऱ्या देशवासीयांची एकाच उच्च असते कि सगळ्याना सामान हक्क आणि कायदे असावेत. याच मुद्यावरून हिंदू एकटा संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे मागणी केली आहे. देशात समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी नाशिक महानगर आणि जिल्हा हिंदू एकता संघटनेने केली आहे. त्यासाठी या संघटनेने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे.

नेमक्या काय मागण्या आहेत?

हिंदू एकटा संघटनेने नरेंद्र मोदी यांच्या कडे सामान नागरी कायद्याची मागणी केली असून त्यात काय काही मुद्दे नमूद केले आहे. ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाले. परंतु भारतीय राज्यघटनेने एकता, समानता व एकात्मता राष्ट्रवाद हे तत्व मान्य केले आहे. याच कारणामुळे भारतातील सर्वांना एकच कायदा असावा. दिल्ली उच्च न्यायालयानेसुद्धा समान नागरिक कायदा लागू करावा, असे सूचित केले आहे. म्हणून न्यायालयाचा आदर ठेवून तमाम भारतीयांसाठी एक देश एक कायदा गरजेचा आहे. देशात समान नागरी कायदा लागू करण्यात यावा’, असं मत हिंदू एकता संघटनेने आपल्या निवेदनाच्या माध्यमातून मांडलं आहे.

न्यायालय काय म्हणलं?

संघटनेने मागणी करण्याच्या आधी उच्च न्यायालयाने मोठी घोषणा केली होती . संविधानाच्या आर्टिकल ४४ मधील समान नागरी कायद्याच्या धारणेला वास्तवात आणण्याची वेळ आली आहे. भारत बदलत आहे. लोक जाती, धर्माच्या पलिकडे जात आहेत. त्यामुळे पारंपरिक बंधने कमी होताना दिसत आहे. अशावेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे, असं मत दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांनी व्यक्त केलं होतं. एका प्रकरणावर सुनावणी करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं होतं. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाच्या याच मताचा आधार घेत हिंदू एकता संघटनेने समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली. आज एक देश एक कायदा असणे काळाची गरज असल्याचं हिंदू एकता संघटनेचं मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रियांका गांधी वॉड्राला उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन

swarit

अदाकारी अँकरला तो म्हणाला आंटी

News Desk