HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतप्रकरणाचे निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी उचलली

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येवरुन पोलिसांना बदनाम केले अशी जोरदार टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. आज (६ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुशांतचे प्रकरण भाजपने हायजॅक करून त्याला वेगळे वळण दिल्याचा दावा अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाने केला आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजप आणि इतरांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

“अमेरिकच्या मिशिगन विद्यापीठानेही सुशांतप्रकरणाचा अभ्यास करून त्यावर अहवाल दिला आहे. भाजपने हे प्रकरण हायजॅक केले. त्याला वेगळे वळण देऊन हे प्रकरण वेगळ्याच दिशेला नेले. त्याशिवाय काही मीडियानेही या प्रकरणाला वेगळे वळण दिले असून या मीडियांची नावेही या अहवालात देण्यात आली”, असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.

“सुशांतप्रकरणाचे निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी उचलली होती. महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्या देण्याचं काम करण्यात आलं. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचावण्याचं काम या पक्षाने केलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा प्रोफेशनली तपास केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तरीही राज्याचं पाच वर्षे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. मुंबई पोलिसांनी योग्य दिशेनं तपास केला नसल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं”, अशी टीका देशमुख यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधींनी बोलावलेली बैठक संपली, शरद पवारांनी दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

News Desk

मराठा आरक्षणासंबंधी दिल्लीच्या वकिलांशी अशोक चव्हाणांनी केली चर्चा

News Desk

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Aprna