HW News Marathi
महाराष्ट्र

मुंब्र्यातील मदरश्यात वस्तरा सापडला तर…, आव्हाडांचे राज ठाकरेंना थेट आवाहन

मुंबई | “मुंब्र्यातील कोणत्याही मदरश्यात वस्तरा जरी सापडला, तरी आपण राजकारण सोडेन,” असे जाहीर आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले आहे. मदरशामध्ये धाडी टाकल्या तर काय काय सापडेल सांगता येत नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी गुढपाडव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मनसेचा मेळव्यात म्हटले होते. यावर आव्हडांनी आज (३ एप्रिल) प्रत्युत्तर दिले आहे. 

आव्हाड म्हणाले, “मुंबई आणि मुंब्रा या ठिकाणच्या झोपडपट्ट्यांतील मदरशांमध्ये गैरप्रकार सुरू असून त्या ठिकाणी धाडी टाकण्याची विनंती पंतप्रधानांना केली होती. राज ठाकरेंनी मुंब्र्याबद्दली कोणतेही कारण नसताना जातीयवादी विधान केले. तर माझे राज ठाकरेंना जाहीर आव्हान केले की, राज ठाकरेंनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरश्यात यावे. मदरशात वस्तरा जरी सापडला, तरी आपण राजकारण सोडेन,” असे थेट आवाहन त्यांनी केले. 

मशिदीवरील लावलेले भोंगे हटवा

“माझा कोणत्याही धर्माच्या प्राथनेला विरोध नाही. परंतु, मशिदीवरील लावलेले भोंगे हे खाली उरवण्याचा निर्णय राज्या सरकारला घ्यावा लागेलच. जर सरकाने हा निर्णय घेतला नाही. तर मशिदीबाहेर भोंगे लागतील, तर त्यांच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावावी. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा उल्लेख नाही. जेव्हा धर्म तयार झाला. तेव्हा लाऊडस्पीकर अस्तित्वात होता का? , बाहेरच्या देशात जाता. तिथे कोणत्याच मशिदीवर लाऊडस्पीकर नसतो. तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर ती तुमच्या घरात करा, असे परदेशातील शासन आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कल्याण-डोंबिवलीत बसलेल्या धक्क्याचा ‘मनसे’ने थेट कोकणात घेतला बदला

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?

News Desk

मराठवाड्यात जलयुक्तमुळे पूर आल्याचा दावा हास्यास्पद, चंद्रकांत पाटलांची टीका!

News Desk