HW News Marathi
Covid-19

“कोरोनाच्या तिसरी लाटेत लहान मुलांची काळजी कशी घ्याल ?”, मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई । राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे. तुलनेने राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी असल्याने सद्यस्थितीत राज्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचाही अंदाज तज्ञांनी व्यक्त केला असल्याने शासन-प्रशासनाने सावध आणि सज्ज राहणे आवश्यकच आहे. ही कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असे संकेत असल्याने याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकांना एक सल्ला दिला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल का ? आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत. पण आपण सावध राहिले पाहिजे”, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला.

राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुले आणि बालकांनाकोरोनाचा संसर्ग दूर ठेवण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्स टीमची स्थापन करण्यात आली आहे. या टास्क फोर्सने राज्यातील आज (२३ मे) राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे देखील सहभागी होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “

मुख्यमंत्री काय म्हणाले?

कोरोना विरुद्धची आपण पूर्ण जिंकलेलो नाही पण रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत आहे. “कोरोनाची जशी साखळी असते. तशी एक घट्ट साखळी आपण देखील तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करु. घाबरू नका, चिंता करू नका. गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत करतो. मात्र, रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये. याची मात्र काळजी घ्या. आपल्या डॉक्टर्सकडून सर्व काही व्यवस्थित समजून घ्या”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “कोरोनाची तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचे वय खाली खाली आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.”

डॉक्टर्सनी मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी डॉक्टर्सकडे देखील एक विनंती केली आहे. “डॉक्टर्सनी मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे. योग्य मार्गदर्शन करावे.” तसेच ऑक्सिजन पुरवठ्याबाबत राज्य सरकार उचलत असलेल्या पावलांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचासह अन्यही काही बाबींचा तुटवडा जाणवला. पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवत आहोत”, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona World Update : जगभरात ३८ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण

News Desk

मीरा- भाईंदर, ठाणेमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

News Desk

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघात ६८ टक्के मतदान

News Desk