HW News Marathi
महाराष्ट्र

१२ वी परीक्षा रद्द करण्याच्या मुद्दयावर आपत्ती व्यवस्थापनाला प्रस्ताव पाठवणार – वर्षा गायकवाड

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र, १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, १२ वीची परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत असताना आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत १२वी परीक्षा रद्द करण्यावर चर्चा झाली. मात्र, अद्याप ठोस निर्णय अजून दिला नाही आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या (२ जून) बैठकीनंतर शालेय शिक्षममंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी असं सांगितलं की, शिक्षण खात्याला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवणार आहे. या प्रस्तावावर चर्चा करुन मगच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण परिस्थीतीची माहीती आजच्या बैठकीत दिली असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांनी काल राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ओमायक्रॉनचे ३ रुग्ण, तर शहराच्या हद्दीत कलम १४४ लागू

News Desk

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे

News Desk

नारायण राणेंवर आता ‘मिशन 114’ची जबाबदारी, महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी !

News Desk