HW News Marathi
महाराष्ट्र

धरणे आंदोलनात शेकडो पत्रकारांचा सहभाग 

नांदेड : पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीसह विविध संघटनांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. पत्रकारांना पेन्शन लागू करावी, छोट्या वृत्तपत्रांच्या समस्या सोडवाव्यात, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, मंजिठीया आयोग लागू करावा आदी मागण्यांसाठी झालेल्या या धरणे आंदोलनात पत्रकारांनी शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. या आंदोलनानंतर पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना देण्यात आले.

शासनाने पत्रकारांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़. आंदोलनादरम्यान संयोजक प्रकाश कांबळे, गोवर्धन बियाणी, विजय जोशी, चारुदत्त चौधरी, अहमद करखेलीकर, माधव अटकोरे आदींनी आपल्या भाषणात शासनाच्या उदासीनतेविरुध्द संताप व्यक्त केला. या आंदोलनात अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांसोबतच शेकडो पत्रकारांनी सहभाग घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या! – अजित पवार

Aprna

मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्टपासून पुन्हा रस्त्यावर उतरणार

News Desk

“मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna