HW News Marathi
महाराष्ट्र

धरणे आंदोलनात शेकडो पत्रकारांचा सहभाग 

नांदेड : पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीसह विविध संघटनांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. पत्रकारांना पेन्शन लागू करावी, छोट्या वृत्तपत्रांच्या समस्या सोडवाव्यात, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, मंजिठीया आयोग लागू करावा आदी मागण्यांसाठी झालेल्या या धरणे आंदोलनात पत्रकारांनी शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. या आंदोलनानंतर पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना देण्यात आले.

शासनाने पत्रकारांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़. आंदोलनादरम्यान संयोजक प्रकाश कांबळे, गोवर्धन बियाणी, विजय जोशी, चारुदत्त चौधरी, अहमद करखेलीकर, माधव अटकोरे आदींनी आपल्या भाषणात शासनाच्या उदासीनतेविरुध्द संताप व्यक्त केला. या आंदोलनात अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांसोबतच शेकडो पत्रकारांनी सहभाग घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपला इशारा!

News Desk

आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण फुकट मिळवा, भातखळकरांचं ट्विट

News Desk

“दादा आता सहन होत नाही”, अजित पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा माफीनामा

News Desk
देश / विदेश

पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत

swarit

श्रीनगर | पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हवाई सीमे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरने घिरट्या घालताना भारतीय लष्कराला दिसले आहे. सफेद रंगाचे हे हेलिकॉप्टर काही वेळ भारतीय सीमा भागात घिरट्या घालत होते.

पूंछ जिल्ह्यात रविवारी (३० सप्टेंबर)ला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाकचे हेलिकॉप्टर भारताच्या गुलपूर सेक्टरमध्ये भारतीय हवाई हद्दीत घुसले होते. भारतीय जवानांच्या लक्षात येताच त्यांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबारी करण्यास सुरुवात केली. लष्कराच्या प्रत्युत्तर दिल्यानंतर हेलिकॉप्टर पाकिस्तानात परतल्याची माहिती मिळाली आहे.

एका बाजुला पाकिस्तान म्हणते की, भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानसोतब भेट नकारली आहे. जर भारत-पाक भेट झाली असती तर दोन्ही देशामध्ये गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे. आणि दहशतवादी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करता आली असती, असे शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले. त्यामुळे भारताला शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी अंतर्गत राजकारणाला महत्त्व देणे गरजेचे असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे कुरैशी यांनी महासभेत सांगितले.

या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दहशतवाद्याच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले होते.‘पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच ते सत्य कशा प्रकारे नाकारण्याचे चांगले कसब त्यांना अवगत आहे येते.’ तसेच ‘पाकिस्तानमध्ये २६/११च्या हल्ल्याचा मास्टर माईंड उजळ माध्याने फिरत आहे’. अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

Related posts

पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरेंसाठी ‘नरेंद्रभाई’, राऊतांचं सूचक विधान

News Desk

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

Gauri Tilekar

‘मनसे’ची मतं आमच्याशी जुळली तर नक्कीच…! फडणवीसांनी दिले नवे संकेत

News Desk