HW News Marathi
महाराष्ट्र

विवाह सोहळ्यातील जेवणातून शेकडो जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

कंधार | एका विवाह सोहळ्यात भोजनानंतर सर्वांना जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना कंधार तालुक्यातील दिग्रस (खुर्द) येथे घडली आहे. या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. विषबाधा झालेल्यांमध्ये पाहुण्यांचा समावेश आहे.

हा विवाहा सोहळा दिग्रस (खुर्द) येथे रविवारी (२१ नोव्हेंबर) पार पडला होता. या विवाह सोहळ्यातील भोजनातून विषबाधा झाली आहे. दुसऱ्या दिवशी रात्रीपासून अचानक गावातील लोकांना लहान-मोठ्यासह उलटी-जुलाब, हात पाय दुखणे व डोके दुकणे असे त्रास जानवू लागले होतं. ही गावकऱ्यांच्या लक्षात येताच कंधार ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.लोणीकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ढवळे साहेबसह आदी डॉक्टर टीम व तालुक्यातील सर्व रूग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेऊन जवळ असेलेल्या उपआरोग्य केंद्र दिग्रस खुर्द येथे जाऊन तात्काळ उपचार कार्य सुरू केल्याने पुढील होणारी दुर्घटना टळली.

विवाह सोहळ्यात भोजनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून बाधित झालेल्या व्यक्तींना अचानक उलट्या आणि मळमळ सुरू झाली. सर्व रुग्णांना परिसरातील आजूबाजूच्या जवळील उपआरोग्य केंद्रात तर अनेक रुग्ण जळकोट, मुखेड व कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात ७५ रुग्णांनवर उपचार चालू असून इतर रुग्ण परिसरातील उप केंद्रात दाखल करून उपचार करण्यात येत आहेत. सकाळपासून परिसरातील शासकीय व खाजगी डॉक्टर मंडळींनी मेहनत घेऊन रुग्णांना बरे करण्यात यश आलं तर अनेक रुग्ण नांदेडला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये अनेक पाहुणे आणि लहान व तरुणाईचा समावेश आहे. लहान मुलं, वृद्ध नागरिक,तरुण व महिलांवर उपचार सुरू असून बाकीच्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचे ते आदेश अद्याप पोचलेच नाही

News Desk

कंगणाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहण्यातच अधिकार नाही – गृहमंत्री

News Desk

नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे! – मुख्यमंत्री

Aprna