HW News Marathi
महाराष्ट्र

यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही…

मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षाकडून अनेक ताशेरे सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर ओढले जात आहेतच. अशातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिले. सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एका खाजगी वाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटले, काही मदत लागली, माझी गरज पडली तर उभं राहायचे. यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय मी घेतला आहे, असे त्यांनी आज स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य सरकार पाच वर्षे टिकेल याची शाश्वतीही यावेळी शरद पवार यांनी दिली. सरकारबद्दल मला स्वतःला शंका वाटत नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे संमिश्र सरकार असून हे सरकार पाच वर्षे चालेल. या सरकारचे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत आणि दुसऱ्यांच्या कामात ते हस्तक्षेप करत नाहीत. समन्वय समिती मिळून आम्ही एकत्र प्रश्न सोडवतो. त्यामुळे सरकार पाच वर्षे चालेल यात काही शंका नाही. जुन्या सरकारने घेतलेले काही निर्णय जर आता सत्तेत असणाऱ्या सरकारने बदलले तर त्याचा राज्यावर विशेष परिणाम होईल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

आपण मराठीचे अभिमानी आहोत. पण अनेक ठिकाणी हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे भाषिक ऐक्य असले पाहिजे, असे सांगतानाच साहित्य, संगीत,नाटक ह्या गोष्टीचा राज्यात प्रसार वाढला पाहिजे. सुसंस्कृत समाज असलेला महाराष्ट्र असला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असाल तर राजीनामा द्या-सुप्रिया सुळे

News Desk

बीडमधील स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडे यांचा जामीन अर्ज फेटाळला 

News Desk

राज ठाकरेंच्या भेटीसाठी वारकरी आणि कोळी बांधव ‘कृष्णकुंज’वर!

News Desk