HW News Marathi
महाराष्ट्र

“पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल”, पंकजा मुंडेंचे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठे विधान

मुंबई | राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात रणसंग्राम सुरू असताना. दुसऱ्या बाजुला राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकींसाठी लॉबिंग सुरू झाली आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आले आहे. पंकजा मुंडेंना विचारणा केल्यावर त्या म्हणाल्या, “निवडणुका आल्या की माझ्या नावाची चर्चा होते. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल,” असे मोठे विधान त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून अर्ज भरण्याचा अंतिम ९ जून आहे. राज्यातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी २ आणि काँग्रेस १ या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या वेळी देखील महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये कलगुतीरा रंगणार आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “विधान परिषदेवर मी जावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु, निवडणुका आल्या की माझ्या नावाची चर्चा होते. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल,” असे त्यांनी टीव्ही ९ चॅनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून ६ जुलै ते २१ जुलै रोजी या कालावधी दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून बुधवारी (२५ मे) रात्री जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा दारूण पराभव झाला होता. यानंतर पंकजा मुंडेंचे पक्षांतर्गत वेगळी आघाडी उघडली होती. पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात भाजप महाराष्ट्रातील पक्षांवर निशाणा साधला होता. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बंड पुकारल्याचा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंनी पक्षातील नेत्यावर टीका करणे बंद केले असून ओबीसीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

10 जानेवारी रोजी “महाराष्ट्र बंद” नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. – मराठा क्रांती मोर्चा

News Desk

सिंधुदुर्गात ‘येड्यांची जत्रा’!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर

News Desk