HW News Marathi
Covid-19

मी मुख्यमंत्र्यांकडे ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी करणार ! 

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने काही कडक पावले उचलली आहे. याच पार्श्वभूमीवर, विकेंड लॉकडाऊनसह अन्य दिवशी देखील अनेक कडक निर्बंध लागू केले आहे. एकीकडे या निर्बंधांविरोधात व्यापारी वर्ग आक्रमक होताना दिसून येत आहे तर विरोधकही यामुद्यावरून आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे संकेत दिले आहेत. राज्यात ३ आठवड्यांचा कडक लॉकडाउन लागू करणयाचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ते ‘टीव्ही९ मराठी’शी बोलत होते.
मंत्री विजय वडेट्टीटीवार यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यात विकेण्ड लॉकडाउनची आवश्यकता होती. कोरोनाबाधितांचा आकडा ज्या पद्धतीने वाढत आहे त्यानुसार पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात हा आकडा १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे, भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. त्याचप्रमाणे, रेल्वेवर देखील निर्बंध आणावे लागतील. कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल”, असे सांगत मंत्री वडेट्टीवार यांनी हे लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

पुढील काही दिवसांत डॉक्टर, नर्सेस कमी पडतील !

“राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना आम्ही ठिकठिकाणी कामाला लावत होतो. तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे, राज्यात फक्त विकेंड लॉकडाऊनच नव्हे तर मी मुख्यमंत्र्यांकडे ३ आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्याची मागणी करणार आहे”, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

राज्यात लसीकरण केंद्र बंद पडण्याची वेळ !

“मी फक्त काँग्रेसचा मंत्री नाही तर आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री आहे. महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती आणि केंद्र सरकार राज्याला देत असलेली सापत्न वागणूक याच पार्श्वभूमीवर मी ही मागणी करत आहे. इतर राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिली जाते. महाराष्ट्रात मात्र लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू केलेली लसीकरण केंद्र बंद पडण्याची वेळ आहे”, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याला दिलासा ! नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला

News Desk

राज्यात आज ३ हजार ६४५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

News Desk