HW News Marathi
महाराष्ट्र

‘हनुमान चालिसा’मुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर आम्ही रोज म्हणू, फडणवीसांचे राज्य सरकारला आवाहन

मुंबई | “महाराष्ट्रात हनुमान चालिसाचे पठण करणे, हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसाचे म्हणू, हिंमत असेल तर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून दाखवा,” असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  ३ मेपर्यंत राज्यभरातील सर्व मशिंदीवरील भोंगे उतरवण्याचे अल्टीमेटम राज्य सरकारला दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल (२५ एप्रिल) सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे आणि फडणवीसांनी सर्व पक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला होता. 

फडणवीस म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदू धर्मीयांच्या सण आणि कार्यक्रमामध्ये अटी व निर्बंधाचे पालन केले जाते. तसेच आता मुस्लिम धर्मीयांमध्येही पालन करावे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचे जाहीर केले होते. परंत, राणा दाम्पत्याना हनुमान चालिसा पठण करण्यास जाता आले नाही तरी देखील त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो. आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा असताना. शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनमध्ये सोमय्यांवर हल्ला केला. राज्य सरकारच्या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, महाराष्ट्रात भाजपची मोठी ताकद आहे.” मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब आजींची रविवारी भेट घेतली. परंतु, आत्महत्या केलेल्या शेतकरी किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची भेट का?, घेतली नाही, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा

Manasi Devkar

राज्यात २२१ नवे रुग्ण, तर कोरोनाबाधितांची संख्या १९८२ वर पोहोचली

News Desk

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार! – मुख्यमंत्री

Aprna