HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल, तर एका विदुषकाची गरज !

मुंबई | केंद्रीय संरक्षण राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे ही एक सर्कस आहे, अशी टीका त्यांनी केली होती. महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल तर त्यांना आता एका विदुषकाची गरज आहे, असा टोला ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना लगावाल आहे. राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसानिमित्त पवारांनी फेसबुक लाईव्ह करून कार्यकर्त्यांशी संवादात त्यांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली.

शरद पवार हे आज (९ जून) उद्या (१० जून) कोकण दौऱ्यावर आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचे पाहाणी दौरा करत आहेत. शरद पवार म्हणाले, पक्ष दोन दशके वेगवेगळ्या टप्प्यातून गेला आहे. सत्ता नसताना आणि सत्ता असताना पक्ष कधीही संपलेला नाही. तो कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे असे पवारांनी म्हटले आहे. १० जून हा राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आहे. या २२व्या स्थापनादिना निमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

शरद पवार पुढे म्हणाले, “काहींनी पक्ष संपेल अशी भाकिते वर्तवली होती पण तसे झाले नाही, कार्यकर्त्यांच्या जोरावर आजही पक्ष आहे. सत्ता असताना आणि सत्ता नसतानाही पक्ष जिवंत ठेवलाय त्या कार्यकर्त्यांचे आभार त्यांनी मानले, असे म्हणत शरद पवार यांनी नाव न घेता महाराष्ट्र भाजपच्या नेत्यावर निशाणा साधला

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर

News Desk

तामिळनाडूत सत्तापालट करणाऱ्या ‘एम के स्टॅलिन’बद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

News Desk

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

News Desk