HW News Marathi
महाराष्ट्र

‘प्रशासनाचा दरार नसेल तर अधिकाऱ्यांवर हल्ले होतात’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई। महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेत, माध्यमांशी बोलताना, ठाणे महापालिका प्रशासन कमकुवत असल्याचा आरोप करत त्या प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्यांनी ठाणेकर नागरिकांनाही जबाबदार मानले आहे. तर हा हल्ला दुदैवी असून पिंपळे यांचे दैवत चांगले तसेच आईवडिलांच्या आशीर्वादामुळे त्या बचावल्या. याशिवाय ही घटना ठाण्याला भूषणावह नसल्याचेही त्यांनी सांगितले.

येवढी मुजोरी कोणाचीही चालू देता कामा नाही

कासारवडवली येथे सोमवारी सायंकाळी महापालिका अधिकारी पिंपळे यांच्या जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून हाताची दोन बोटही कापली गेली आहेत. तसेच त्यांचा सुरक्षारक्षक पालवे याच्याही एक बोट कापला गेला आहे. त्यांच्या ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्यातील आमदार व राजकीय नेते मंडळींसह विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बुधवारी रात्री गृहनिर्माण मत्री डॉ. आव्हाड यांनीही रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर गृहनिर्माण मंत्र्यांनी बोलताना, येवढी मुजोरी कोणाचीही चालू देता कामा नाही. प्रशासनापेक्षा कोणी मोठा आहे, अशी भावना जेव्हा निर्माण होते. तेव्हा ते प्रशासन न कमकुवत असते असे उद्गार काढून आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले. तसेच पुढे चे बोलताना, प्रशासनाचा एक दरारा तसेच दहशत न पाहिजे.

ज्या दिवशी दहशत आणि दरारा संपते त्यावेळी अशा घटना घडतात

तसेच फेरीवल्यांविरोधात ओरडणाऱ्या ठाणेकरांचे ही कान टोचले. त्या फेरीवाल्यांकडे रांगा लावून कोण उभे असते. असा सवाल करत मार्केटमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तुम्हीच चालत नसल्याने न घरातून उतरल्यावर फेरीवाल्याकडून घेतले की गेले घरी अशी अवस्था ठाणेकरांनी स्वतःची केली आहे. असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त नुसते महापालिकेला जबाबदार न धरता, त्याबाबत समाजाची ही तितकीच जबाबदारी रा असल्याचे ही आव्हाड म्हटले. या भेटी दरम्यान से आव्हाड यांच्यासोबत माजी नगरसेवक अमित च सरय्या आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल, टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम देणार, आव्हाड म्हणतात आनंद आहे!

News Desk

जालना रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार! – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Aprna

औरंगाबादेतील ४०० शाळा अंधारात

News Desk