HW News Marathi
महाराष्ट्र

जर मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळाले तर आम्हाला आनंद होईल !

मुंबई | लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभेत घवघवीत यश मिळविलेल्या भाजप-शिवसेना युतीने विधानसभा निवडणूक देखील एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरीही मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत या दोन्ही पक्षात संभ्रम कायम आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक विधान केले आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल”, असे विधान नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

नीलम गोऱ्हे या सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. नीलम गोऱ्हे यांनी आज (१२ जुलै) आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाचा होणार ? याबाबत उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील”, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्याचप्रमाणे “आदित्य ठाकरे हे विधानसभेत आले तर तरुणांना राजकारणात प्रेरणा मिळण्यासाठी एक चांगला संदेश समाजात जाईल”, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न !

News Desk

राज ठाकरे, प्रवीण गायकवाड समर्थकांमध्ये पुन्हा उत्तर प्रत्युत्तर मालिका सुरूच..!

News Desk

‘वंदे मातरम्’ अभियानाचा आज होणार शुभारंभ! – सुधीर मुनगंटीवार

Aprna