HW News Marathi
महाराष्ट्र

“आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती”,चंद्रशेखर बावनकुळेचं मोठं वक्तव्य

नागपूर। गेल्या अनेक दिवसांपासून राज्य अंधारात जाईन, कोळशाचा साठा संपला आहे अशा चर्चांना उधाण आलंय. कोळश्याच्या टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची वेळ आली आहे. म्हणूनच विरोधक आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वेळोवेळी संघर्ष पहायला मिळतोय. आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा खुलासा करत राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्यानंच राज्यावर ही वेळ आल्याचं वक्तव्य माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

कोळसा लिफ्टींगची परवानगी न दिल्याने ही वेळ

पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 2800 कोटी रुपये कोळशाचे थकीत असल्याने महाराष्ट्रावर अंधारात जाण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचा तिन्ही कंपन्यांशी ताळमेळ नाही. कोळसा लिफ्टींगची परवानगी न दिल्याने ही वेळ राज्यावर आली आहे. ऊर्जा विभागाने कोळशाचे योग्य नियोजन केलं नाही. कोळशाचा पुरेसा साठा न केल्याने ही वेळ आली आहे. महाजनकोकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. गरज भासल्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला 4-5 हजार कोटी द्यावे, कर्ज घ्यावं, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.

आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती

आमचं सरकार असतं तर तातडीने 2800 कोटी रुपये दिले असते. दिल्लीत जाऊन बसलो असतो आणि कोळसा मिळवला असता. आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती. शेतकऱ्यांना वीज दिल्याने कधीही वीज कंपनी घाट्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.महाजेनकोकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे, कोळशाअभावी वीजनिर्मितीचे राज्यात 13-13 संच बंद झाले आहेत. ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरु झालंय… संपूर्ण राज्य काळोखात जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. ऊर्जा विभागाने योग्य नियोजन न केल्याने ही वेळ आलीय, असं ते म्हणाले.

कोळसा पुरवठा परिस्थिती सुधारली असून

दरम्यान, महानिर्मितीने एक प्रसिद्धी पत्रक काढून राज्यातील कोळश्याच्या स्थितीवर प्रकाश टाकला आहे. सद्य:स्थितीत वीज निर्मितीसाठी लागणार कोळसा पुरवठा परिस्थिती सुधारली असून, दररोज 90 हजार ते 1 लक्ष मे. टन कोळशाचा पुरवठा होत आहे. कोळशाचे नियोजन करण्यासाठी महानिर्मितीचे, भुसावळ 210 व 500 मे.वॅ. चंद्रपूर 500 मे.वॅ., पारस 210 मे.वॅ. हे संच बंद ठेवण्यात आले होते. यापैकी कोळसा पुरवठ्यात वाढ झाल्याने भुसावळ 500 मे.वॅ. हा संच सुरु करण्याचे नियोजन आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरमध्ये ‘आमचं ठरलयं विकास आघाडी’ या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता

News Desk

जिथे पॉझिटिव्हीटी रेट जास्त तिथे लसीकरण वाढवण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंचें आदेश!

News Desk

आजपासून भरता येणार बारावीच्या परीक्षेचे अर्ज

News Desk