HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज ५ वाजता महत्वाची बैठक

मुंबई | राज्याचं पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं असणार आहे. ५ आणि ६ जुलैला हे अधिवेशन होणार असून पुन्हा एकदा भाजपने यावरुन टीका केली आहे. याच पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात बऱ्याच हालचाली सुरु आहेत. आज (१ जूलै) ५ वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत अधिवेशनाचा कावधी वाढवावा यासाठी निवेदन दिलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना काल (३० जून) पत्र लिहून कालावधी वाढवण्यावर विचार करावा, आणि विधानसभा अध्यक्ष पदावर तातडीने निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं. त्यानंतर आज ही महाविकासआघाडीची महत्वाची बैठक होणार आहे.

या चर्चेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र पाठवण्याची शक्यता आहे. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी यासंदर्भात राज्यपाल यांना मुख्यमंत्री आज पाठवू शकतात. दरम्यान संग्राम थोपटे यांच्या नावावर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा कौल असल्याचं बोललं जात आहे. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसंच काँग्रेस हायकमांडकडे थोपटे यांचं नाव पाठवावं असं राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत असल्याचंही बोललं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गायीच्या दुधात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ

News Desk

रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है…संजय राऊतांचे वादग्रस्त ट्विट

News Desk

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

News Desk