HW News Marathi
Covid-19

मुंबई-पुण्यात ८ दिवसांत, तर राज्यात ‘सप्टेंबर’पासून कोरोना रुग्णसंख्या कमी होणार !

मुंबई | “महाराष्ट्रात ऑगस्ट अखेरपर्यंत कोरोना रुग्णवाढ होतच राहील. मात्र, त्यानंतर चित्र बदलेल. सप्टेंबर महिन्यापासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात होईल”, असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुणे आणि अन्य आसपासच्या परिसरांत पुढील ८ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल”, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी राजेश टोपे ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलत होते.

“गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात चाचण्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच राहणार आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून हळूहळू कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होण्यास सुरुवात होईल”, असा अंदाज राजेश टोपेंनी व्यक्त केला आहे. “जर एखाद्या शहरात २० ते २५ टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग झाला तर कोरोना रुग्णसंख्येत घट होते असे एक सर्वसाधारण निरीक्षण आहे”, असेही राजेश टोपेंनी यावेळी नमूद केले आहे.

“संपूर्ण राज्याच्या तुलनेत मुंबई, पुण्यातच नव्या कोरोनारुग्णांची वाढ सर्वाधिक आहे. मात्र, ही वाढ कमाल प्रमाणात आहे. यापुढे, मुंबई-पुण्यात कोरोनारुग्णांची वाढ याहून अधिक वाढणार नाही. उलट पुढच्या ८ दिवसांत राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुणे आणि अन्य आसपासच्या परिसरांत पुढील ८ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल. मात्र, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात यायला आणखी काही वेळ लागेल”, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Tokyo Olympic 2021 | ऑल्म्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव, ६ दिवसांनी सुरू होणार स्पर्धा

News Desk

चिंताजनक ! देशात एका दिवसात सर्वाधिक ९ हजार ३०४ रुग्णांची वाढ

News Desk

कोरोनावरील उपचारासाठी अशोक चव्हाण लिलावती रुग्णालयात दाखल

News Desk