HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून फडणवीसांनी कोरोनासंदर्भातील ‘या’ बाबी निदर्शनास आणले

मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना मोठ्या प्रामाणात फैलाव झालेला असून सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८९१ वर येऊन पोहोचली आहे. यामुळे देशात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधित आहे. तर एकट्या मुंबई कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ५२६वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (७ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रत फडणवीसांनी लिहिले की, “संपूर्ण देशात तसेच राज्यायत आपण सारे कोरोनाविरोधातील लढा लढतोय. हा लढा येणाऱ्या काळात अधिकाअधिक तीव्र होणार आहे. यामुळे अधिक नियोजनातून आपल्याला मार्गक्रमण करावे लागणार आहे. आज राज्य मंत्री मंडळाची बैठक होत असल्याने त्वरित निर्णय घेण्यासाठी काही बाबी या पत्रातून मी आपल्या निदर्शनास आणतो आहे. “

फडणवीसांनी याबाबी निदर्शनास आणल्या

१ . राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी 90 टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. 16 राज्यांनी रेशनकार्ड नसतानाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्याचे धान्य त्वरित उपलब्ध करुन द्यावे. शिधापत्रिका नसल्यास आधार कार्ड प्रमाण मानावे, तेही नसल्यास यादी तयार करुन प्रमाणित करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

२. मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि एकूण लॉकडाऊनच्या काळातील परिस्थिती यांचे गांभीर्याने चिंत होणे गरजचे आहे. रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनाची कमतरता असल्याचे समोर येत आहेत. याबाबत ही त्वरित उपयोजना करण्याची नितांत गरज आहे. त्यांनाही कोरोना रोगाने ग्रासल्याने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

३. तब्लिकमधून आलेले अनेक जण महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये गेले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित नागरिक आणि त्यांच्या संपर्कात आलेले इतर संशयित यांच्याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई करा. भारतातील कोरोनग्रस्तांच्या यादीत ही संख्या मोठी असल्याने कडक कारवाई करा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये अनोखी घटना! शेळीनं दारात लावलेल्या झाडाचा शेंडा खाल्ल्यामुळे वाद

Aprna

कोरोनाच्या काळात राजकारण करणाऱ्या प्रवृतींना त्यांची जागा दाखवायला हवी, अमोल कोल्हे कडाडले 

News Desk

शरद पवार यांना समजून घ्यायला लोकांना १०० जन्म लागतील !

News Desk