HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील ८ लोकप्रतिनिधींना होम क्वारंटाइनच्या दिल्या सूचना

बीड | कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असताना बीड जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक योजना करण्यात आलेल्या आहेत. परजिल्ह्यासह विदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर आहे. अशात गेल्या दोन दिवसापासून बीडमधील क्षीरसागर यांना क्वारंटाइन करण्यावरुन चर्चेला उधाण आले आहे. सुरुवातीस माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना क्वारंटाइन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना क्वारंटाइन केले. परंतु माजी मंत्री क्षीरसागर हे ज्या घरात राहतात त्याच इमारतीत आ.संदीप क्षीरसागर हे राहत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी संदीप क्षीरसागर यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, शासनाच्या सूचनांनुसार जयदत्त क्षीरसागर व त्यांच्या कुटूंबियांना व ते राहत असलेल्या इमारतीतील सर्वच व्यक्तींना (वाहनचालकांसह) होम क्वारंटाइनच्या सूचना दिल्या आहेत, असे पत्रात म्हटले आहे.

या पत्रानुसार, क्षीरसागर यांनी सकाळी स्वतःच्या फेसबुक पेजवरुन एका पोस्टमध्ये मी व माझे कुटूंब होम क्वारंटाइन होत असल्याचे जाहीर केले होते. आता जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार क्षीरसागर यांच्या कुटूंबातील सर्वांनाच होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. विशेष म्हणजे यात आठ आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समोवश असून त्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारभूषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष दीपाताई क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई क्षीरसागर, गजानन कारखान्याचे अध्यक्ष रविंद्र क्षीरसागर, नगरसेवक योगेश क्षीरसागर यांचा समावेश आहे. दरम्यान, क्षीरसागर कुटूंबियांना होम क्वारंटाइन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मला राऊतांनी जोड्याने मारावे! – किरीट सोमय्या

Aprna

नोकरीची सूवर्णसंधी! राज्यात १२,५०० पोलिसांची भरती

News Desk

उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री असतील! नाना पटोलेंचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk