HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरातील पंचगंगेच्या पातळीत २ फुटांनी घट

कोल्हापूर | गेल्या ८ दिवसापासून मुसळधर पावसाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहाकार माजला आहे. आता पंचगंगेची पाणी पातळी २ फुटांनी घटली असल्यामुळे कोल्हापूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शासनाने आतापर्यंत एकूण २३९ गावांमधून २३ हजार ८८९ कुटुंबातील १ लाख ११ हजार ३६५ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अडकलेल्या २४जणांना बाहेर काढण्यात आले. तसेच आंबेवाडीमधील ९९ टक्के तर प्रयाग चिखली मधील ८५ टक्के कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी पात्रातून तब्बल चार फुट पाणी आल्याने वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे तब्बल ५ हजार ट्रक महामार्गावर अडकले आहेत. त्यामुळे वाहतूकीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र काल (८ ऑगस्ट) रात्री शिरोली टोल नाक्याजवळील होंडा शोरूम जवळ पाणी होते आज (९ ऑगस्ट) तिथून पुढे तावडे हॉटेलकडे १०० मीटर पर्यंत पाणी ओसरले आहे. कदाचित आज रात्री हायवे खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यात पूरस्थिती बिकट असून, या तीन तालुक्यांतील पूरग्रस्तांसाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याला चारी बाजूने पुराच्या पाण्याने ओढल्याने बचावकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल तसेच लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीच्या कारवाईविरोधात मलिकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द!

News Desk

”महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करुन देईल”, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर उदय सामंतांची टीका!

News Desk