HW News Marathi
महाराष्ट्र

हल्ली महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्यं; अजित पवारांची पंतप्रधानांकडे तक्रार

पुणे | “अलिकडेच्या काळात महत्त्वाच्या पदावरील सन्मानीय व्यक्तीकडून काही अनावश्यक वक्तव्ये होत आहेत. ही वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पटणारी नाहीत आणि मान्य देखील नाहीत,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती लगावाल आहे. पंतप्रधान हे आज (६ मार्च) पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले असून पुणे मेट्रोचे उदघाटन, पीएमपीएलच्या १०० ई-बस आणि ई-बस डेपोचे लोकार्पण केले आहे. 

दरम्यान, “अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. मला पंतप्रधानांना मला एक गोष्टीकडे लक्षात आणून त्यांची आहे. अलिकडेच्या काळात महत्वाच्या पदावर सन्मानीय व्यक्तीकडून काही अनावश्यक वक्तव्ये होत आहेत. ही वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पटणारी नाहीत आणि मान्य देखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि राजमाता जिजाऊंच्या यांनी संकल्पनेतील स्वराज्य स्थान केले. महात्मा फुले आणि क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांनी देशात स्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचाराचा प्रसार केला. या महामानवाच्या कार्याच्या विचाराचा वारसा आपल्या सर्वांना महाराष्ट्रमध्ये पुढे घेऊन जायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस आणि असूया न ठेवता. विकास कामात राजकारण न करता, हा वारसा, या महामानवांचे विचार आपल्याला पुढेण्याचे आहेत. असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे.” 

 पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या महाराजांचा पुतळा १८५० किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे ९.५ फूट आहे. काँग्रेसमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढल्याचे वादग्रस्त विधान पंतप्रधानांनी संसदेत केले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून आंदोलन सुरू आहेत. मोदींनी ३३ किली लांबीच्या पुणे मेट्रॉच्या १२ किमी मार्गाचे उद्घाटन केले आहे. दरम्यान मोदींनी पुणे मेट्रोच्या पुढील कामाच्या आराखड्याची पाहणी देखील केली. तसेच पंतप्रधानांनी पुणे मेट्रोतून प्रवास करण्यापूर्वी स्व:ता तिकीट केली आहे. मेट्रो प्रवासादरम्यान मोदींनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील १५१ तालुक्यांसह आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

News Desk

‘आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही’

News Desk

“किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन करा”, छगन भूजबळ मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार!

News Desk