HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई | बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (१६ जून) राजभवनावर पार पडला आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. उद्यापासून (१६ जून) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी देण्यात आली आहे हे जाणून घेऊया.

‘हे’ आहेत नवे कॅबिनेट मंत्री

  • राधाकृष्ण विखे पाटील
  • आशिष शेलार
  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
  • तानाजी सावंत (शिवसेना)
  • संजय कुटे
  • सुरेश खाडे
  • डॉ. अनिल बोंडे
  • डॉ. अशोक उईके

हे’ आहेत नवे राज्यमंत्री

  • योगेश सागर
  • अतुल सावे
  • संजय उर्फ बाळा भेगडे
  • परिणय फुके
  • अविनाश महातेकर
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाचा पंतप्रधान कोण, मोदी की शहा ?

News Desk

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

News Desk

“भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे” कुसुमाग्रजांना स्मरून राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

News Desk