HW News Marathi
महाराष्ट्र

विधीमंडळ प्रांगणात मराठी अभिमान गीतातलं महत्त्वाचं कडवं गाळलं

महाराष्ट्र गीत सादर करताना अखेरचे कडवे गायब झाल्याने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी मराठीचा जाणिवपूर्वक अवमान केल्याचा आरोप करत विरोधकांना सभागृहात संबंधितांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

दरम्यान, याच गोंधळात सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. महाराष्ट्र गीत सादर करताना अडथळा आला. त्यात महाराष्ट्र गीताचा शेवटचे कडवे गायब झाल्याचा मुद्दा अजित पवार यांनी कामकाज सुरू होताच उपस्थित केला. जयंत पाटील यांनी हा मराठीचा अवमान असल्याचे सांगितले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत जयंत पाटील यांचा आक्षेप खोड़ून काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हा मराठीची अवमान असल्याचे म्हटले. यानंतर विरोधकांना घोषणाबाजी केली. अखेर सभापतिंनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते!

News Desk

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा राणेंकडून सत्कार

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट!

News Desk