HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या ३१ वर, तर देशात रुग्णांचा आकडा १०० पार

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना व्हायसर पाय पसरावायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ वर गेली आहे. यामुळे भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकावर आला आहे. केरळमध्ये २२ कोरोनाग्रस्तांची संख्या आढळून आली आहे. देशात करोनाग्रस्तांची संख्या १०६ वर गेली आहे. देशातील कर्नाटक आणि दिल्लीमध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

राज्यात काल (१४ मार्च) एका दिवसात करोनाग्रस्तांची संख्याही १२ ने वाढली आहे. पुण्यात १५, मुंबई ५, नागपूर ४, यवतमाळ २, नवी मुंबई २, ठाण्यात १, कल्याण १, अहमदनगर १, राज्यात कोरोनाग्रस्तांची अशी आहे. तर देशात केरळ २२, हरियाणा १४ (सर्व परदेशी नागरिक), उत्तर प्रदेश १२, दिल्ली ७, कर्नाटक ६, राजस्थान ४, पंजाब १, जम्मू काश्मीर १, लडाख ३, तामिळनाडू ३, तेलंगणा २ यांचा समावेश आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा- महाविद्यालये बंद

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता राज्यशासनाने अत्यावश्यक पावले उचलली असून राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या यासोबतच सर्व मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या पुर्वनियोजित परिक्षा सुरु राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरु राहणार असून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. दैनंदिन गरजेसाठी किराणा दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संकटाचा कुणीही दुरुपयोग करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल येथे केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवार भडकले?

News Desk

मेहबूब शेख यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे आमदार खंबीरपणे उभे राहिले 

News Desk

‘हा तर लोकांचा आणि लोकशाहीचा अपमान’ – नरेंद्र मोदी

News Desk