HW News Marathi
Covid-19

कोरोना काळातील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता

मुंबई । कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (२ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. राऊत म्हणाले की, कोविड कालावधीमध्ये अनेकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला. तसेच घरामध्ये रहावे लागल्यामुळे जास्त वीजवापराने अधिकची वीजबिले आली. त्यामुळे या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे.

“मुंबईसाठी खात्रीशीर आणि दर्जेदाररित्या वीज कशी उपलब्ध करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील असून वीजपुरवठा खंडित होण्याची १२ ऑक्टोबरसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी महापारेषण, एसएलडीसी, टाटा पॉवर कंपनी आणि अदानी एनर्जी कंपनी यांच्यात समन्वय साधण्याची कार्यक्षम संदेशवहन आणि समन्वय व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत”, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

२०३० पर्यंत मुंबईची विजेची मागणी सुमारे ५ हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबईला अखंडीत वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने वीजनिर्मितीमध्ये वाढ करणे, त्यासाठीचे नियोजन, त्याचा उत्पादन दर काय असेल आदींबाबत विचार करण्यात येईल. सध्या टाटा वीज प्रकल्पातील दोन संच बंद असून त्यातून अधिकची वीजनिर्मिती करता येईल तसेच तयार होणाऱ्या वीजेचा दर माफक असेल आदींबाबतही विचार करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांसाठी परदेशातून लसी मागवण्यासंदर्भात हालचाली सुरु – आदित्य ठाकरे

News Desk

दारूचे कारखाने लाॅकडाऊन काळातही सुरू होते का?, विश्वंभर चौधरींचा सरकारला सवाल

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौरा करण्याची शक्यता!

News Desk