HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ, राज्य राखीव दलातील 7 तुकड्या तर 30 हजार होमगार्ड तैनात

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मशिदींवर भोंगे उतरण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात राखीव दलातील ७ तुकड्या तर ३० हजार होमगार्ड तैनात करण्यात आले असून राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याशी आज (३ मे) आढावा बैठक पार पडली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम असून कोणी कायदा हाता घेतला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महासंचालकांनी आज (३ मे) घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी दिली. तसेच राज्यभरात एसआरपीएफ आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात अले असून कायद्याची अंमबलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला, असे आवाहन महासंचालकांनी केले आहे.

महासंचालक म्हणाले, “राज्याचे गृहमंत्री दिलीप- वळसे पाटील यांनी कायदा सुव्यवस्थेच्या अनुगाने आढावा बैठक बोलवली. महाराष्ट्र पोलीस दल हे कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी सक्षम आहे. आणि आमची पूर्ण तयारी आहे. सर्व पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाबतीत ठेवण्यासाठी स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याआधी समाजकंठकं व गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यभरात एसआरपीएफ आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमबलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला, आवाहन करतो. त्यांनी राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखावी, आणि पोलिसांना सहकार्य करावे.”

 पोलिसांना आवश्यकती करवाई करण्याचे निर्देश

“ईद आणि अक्षय्य तृतीया दिनाच्या माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. गृहमंत्र्यांनी आज (३ मे) बैठक बोलवली, या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. महाराष्ट्र पोलीस कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सक्षम आहे. आणि आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही राज्यातील सर्व पोलिसांना कायदा व सुव्यवस्था बिघडून नये, असे स्पष्ट निर्देश दिले असून यासाठी आवश्यक ते पाऊले उचलणार आहे,” असे महासंचालक म्हणाले. 

औरंगाबाद पोलीस आयुक्त योग्यती करवाई करतील

पोलीस राज ठाकरेंच्या भाषणावर आतापर्यंत करवाई का गेली नाही?, असा सवाल पत्रकारांनी महासंचालकांना विचारला होता, ते म्हणाले, “औरंगाबाद पोलीस आयुक्त त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण अभ्यास केला आहे. या भाषणाच्या अनुशगाने अवश्यकती कारवाई करण्यासाठी ते सक्षम असून ते योग्यती करवाई करतील. या प्रकरणी जी काही कारवाई करायची आहे. कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक करवाई करू. महाराष्ट्र पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ७ एसआरपीएफ कंपनी आणि ३० हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत”. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

नागपूरवाले मला मध्येच म्यूट का करतायत? मुख्यमंत्र्यांचा मिश्किल सवाल

News Desk

पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू!

News Desk