HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा

मुंबई | मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज (शनिवार) दुपारी यशवंतराव चव्हाण केंद्र या ठिकाणी बैठक घेतली होती. या बैठकीत २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा केली नाही तर २१ तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलनाला सुरुवात होईल, अशी माहिती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी दिली आहे.

सरकारने मराठा समाजाला जी आश्वासने दिली आहेत. त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांनी कोणतीही अधिकृत अशी भूमिका जाहीर केलेली नाही. सरकारने दिलेले आश्वासनांत आरक्षण वैधानिक कार्यवाही १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मान्य केले होते. तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवू, असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मात्र सरकारला त्याचा विसर पडल्याचे दिसत असल्याचा आरोप लोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत उभारणार ‘मुंबई आय’

swarit

बाळासाहेब थोरात वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार, कोरोना लसीकरणासाठी कॉंग्रेसची मदत

News Desk

नव्या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कुणाला? सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग रचना का केली? एकनाथ शिंदेंचं सविस्तर उत्तर!

News Desk
देश / विदेश

शबरीमाला हिंसाचार प्रकरणी २,०६१ जणांना अटक

swarit

तिरुअनंतपुरम । शबरीमाला हिंसाचारप्रकरणी केरळ पोलिसांनी आत्तापर्यंत २ हजार ६१ जणांना अटक केली आहे. तसेच १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखल्याप्रकरणी ४५२ जणांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. शबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर १७ ऑक्टोबरला अय्यप्पा मंदिर उघडल्यानंतर अनेक विरोध प्रदर्शने झाली होती. यावेळी सर्वच वयोगटातील महिलांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मंदिर प्रवेशाच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता.

शबरीमला मंदिरात मासिक पाळी येणार्‍या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्याला बंदी होती. दुसरीकडे पुरुषांच्या प्रवेशावर असे कोणतेही निर्बंध नव्हते. दरम्यान हिंसाचाराला प्रोत्साहन देणे, पत्रकारांना आणि भक्तांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी बुधवारी २१० जणांना लुकआउट नोटीस बजावली आहे.

सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक खंडपीठाने 28 सप्टेंबरला सर्व महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. मात्र तरिही अद्याप एकाही महिलेला शबरीमला मंदिरात प्रवेश मिळालेला नाही. मासिक पुजेसाठी 5 दिवस मंदिर उघडल्यानंतर 22 ऑक्टोबरला मंदिर महिनाभरासाठी बंद करण्यात आले आहे.

Related posts

शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

swarit

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

Breaking News | NCB कडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

News Desk