HW News Marathi
देश / विदेश

शबरीमाला हिंसाचार प्रकरणी २,०६१ जणांना अटक

तिरुअनंतपुरम । शबरीमाला हिंसाचारप्रकरणी केरळ पोलिसांनी आत्तापर्यंत २ हजार ६१ जणांना अटक केली आहे. तसेच १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखल्याप्रकरणी ४५२ जणांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. शबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर १७ ऑक्टोबरला अय्यप्पा मंदिर उघडल्यानंतर अनेक विरोध प्रदर्शने झाली होती. यावेळी सर्वच वयोगटातील महिलांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मंदिर प्रवेशाच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता.

शबरीमला मंदिरात मासिक पाळी येणार्‍या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्याला बंदी होती. दुसरीकडे पुरुषांच्या प्रवेशावर असे कोणतेही निर्बंध नव्हते. दरम्यान हिंसाचाराला प्रोत्साहन देणे, पत्रकारांना आणि भक्तांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी बुधवारी २१० जणांना लुकआउट नोटीस बजावली आहे.

सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संवैधानिक खंडपीठाने 28 सप्टेंबरला सर्व महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. मात्र तरिही अद्याप एकाही महिलेला शबरीमला मंदिरात प्रवेश मिळालेला नाही. मासिक पुजेसाठी 5 दिवस मंदिर उघडल्यानंतर 22 ऑक्टोबरला मंदिर महिनाभरासाठी बंद करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, लवकरच कळेल मध्यस्ती होणार की नाही?

Atul Chavan

तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, CDS बिपीन रावत कुटुंबासोबत असल्याची सूत्रांकडून माहिती

News Desk

कोरोनाच्या चाचणीत आपला देश आत्तापर्यंत अयशस्वी – राहूल गांधी

News Desk