HW News Marathi
महाराष्ट्र

“ज्या वनामध्ये वाघ संचार करतो, ते वन पर्यावरणीय दृष्टीने समृद्ध असते”

मुंबई | आज (२९ जुलै) जागतिक व्याघ्र दिवस आहे. याच दिवसाला अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाच्या बाबी सांगितल्या. ट्विटरद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी या दिनाचे त्यांना किती महत्व आहे आणि इतर महत्त्वाच्या बाबी देखील सांगितल्या.

“आज व्याघ्र दिन, वाघ म्हटल्यानंतर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहेच. पण आपली एक प्रथा आहे, एखाद्या विषयाच आपण एका दिवशी कौतुक करतो आणि पुन्हा वर्षभर त्याची आठवण देखील येत नाही. आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये ३०० च्या आसपास वाघ आहेत. ही वनसंपत्ती आहे. आपण संपत्ती किंवा समृध्दी कशी गृहीत धरतो? आपल्याकडे असलेली ही वनसंपत्ती, जंगल संपत्ती तिचा कधी आपण विचार कर्त नाही. काही देश तर केवळ वनसंपत्तीवर आपली आर्थिक बाजू अधिक मजबूत करतात. एकूण काय तर आपण आपल्याबरोबर या सर्वांचं सहजीवन स्वीकारत नाही आहोत”, अशी तक्रार त्यांनी केली आहे.

पुढे ते असे म्हणाले की, ” व्याघ्र दिवस म्हटल्यानंतर किंबहुना इतर कोणताही दिवस म्हटलं की हल्लीच्या टेक्नॉलॉजीमध्ये हॅपी अमुक अमुक दिवस म्हणून मेसेज पाठवला जातो. इतर दिवशी त्याच काहीही होत नाही. म्हणून मला असं वाटतं की हा व्याघ्र दिवस एका दिवसापूरता मर्यादित न राहता वाघाचे महत्व आपण जाणले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार, कार्यकर्त्यांनी हाती बांधले शिवबंधन

News Desk

आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी केलं, बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये,निलेश राणेंचा प्रहार

News Desk

पुनर्विकासासाठी  म्हाडा सर्वतोपरी प्रयत्नशील! –  जितेंद्र आव्हाड

Aprna