HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण

मुंबई। राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकाला लागून दोन आठवडे लागून सुद्ध सत्तापेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना-भाजप या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू असल्यामुळे सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार (८ नोव्हेंबर) यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. यानंतर घटनेनुसार सर्वा जास्त जागा मिळालेल्या मोठ्या पक्षला म्हणून राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिले आहे. आता भाजप राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारुन बहुमत कसे सिद्ध करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची आज (१० नोव्हेंबर) बैठक होणार आहे. राज्यात सत्ता स्थापन संदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या चर्चेननंतर सत्तास्थापनेबद्दल निर्णय होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. भाजपला राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. भाजप शिवसेनेच्या आमदारांशी कुणीही संपर्क करु नये, यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. शिवसेनेने आमदारांची सर्व जबाबदारी खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर, मिलिंद नार्वेकर, रामदास कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांची मालाड येथील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यन खानच्या बेलसाठी राम कदम यांचं देवाकडे साकडं!

News Desk

क्रांती रेडकरांनी नवाब मलिकांविरोधात दाखल केला FIR

News Desk

मुख्यमंत्र्यांनी महाडमधील बचाव कार्याचा आढावा घेतला!

News Desk